मुलांनी जबाबदार व्हावं असं पालकांना वाटत असेल तर सुधा मूर्तींच्या 'या' पॅरेंटिंग टिप्स फॉलो करा

Sudha Murthy Parenting Tips: पालक अनेकदा मुलांना चांगले संस्कार देतात. पण मुलांना जबाबदार कसं बनवावं, हे त्यांना कळत नाही. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स करतात मदत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 3, 2024, 11:28 AM IST
मुलांनी जबाबदार व्हावं असं पालकांना वाटत असेल तर सुधा मूर्तींच्या 'या' पॅरेंटिंग टिप्स फॉलो करा  title=

Sudha Murthy Parenting Tips in Marathi: प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे चांगले संगोपन करायचे असते. मुलांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले नाही तर ते चुकीच्या मार्गावर जातात. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांना चांगले संगोपन देण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. सुधा मूर्ती या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यासोबतच, भारतातील सर्वात मोठी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी, टेल्कोमध्ये काम करणारी पहिली महिला अभियंता देखील आहे. त्यांनी दिलेल्या या टिप्स तुमच्या मुलांना स्वावलंबी आणि जबाबदार बनवण्यात मदत करतील. 

सक्ती करू नका
मुलांच्या संगोपनाबाबत सुधा मूर्ती म्हणाल्या की, त्यांच्यावर काहीही लादू नका. मुलांवर जबरदस्ती करू नका. कोणतीच गोष्ट मुलांना जबरदस्ती करायला सांगू नका. कारण सक्तीने कोणतीच गोष्ट शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही मुलांशी प्रेमाने संवाद साधा आणि त्यांना प्रेमाने समजवा. 

कोणाशीही तुलना करू नका
मुलांनी स्वतःची इतरांशी तुलना करू नये, असे सुधा मूर्ती यांचे मत आहे. याचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. पालक अनेकदा मुलांची तुलना करण्यात व्यस्त असतात. पण असं अजिबात करु नका. कारण मुलांमध्ये देखील हा गुण तयार होतो. मुलं कायमच एकमेकांशी तुलना करायला शिकतात. 

मुलांना फोनपासून दूर ठेवा
मुलांना फोनपासून दूर ठेवले पाहिजे कारण फोनवर असण्याचा त्यांच्या संगोपनावर मोठा परिणाम होतो. आजकाल मुलं फोनवर बराच वेळ घालवतात पण त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पालक अनेकदा कामासाठी फोन घेतात पण मुलांना असे वाटते की, हा फोन त्यांनी सहज हाती घेतला आहे. म्हणून मुलांना ठराविक वेळेसाठी फोन हातात देण्याची सवय लावा. 

मुलांना जबाबदाऱ्या सांगा
मुलांच्या वयानुसार त्यांच्या जबाबदाऱ्या पालकांना सांगायला हव्यात. त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. कारण मुलांना तुम्ही खूप महत्त्वाचा कुटुंबाचा भाग असल्याचं सांगा. कारण यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. अशावेळी मुलांना जबाबदारीची जाणीव होते. 

प्रत्येक मागणी पूर्ण करू नका
सुधा मूर्ती यांचे मत आहे की, मुलांच्या सर्व मागण्या कधीही पूर्ण करू नयेत. मुले अनेकदा त्यांच्या मित्रांना किंवा इतर कोणत्याही मुलाला पाहिल्यानंतर वस्तू मागण्याचा आग्रह धरतात, परंतु काहीवेळा पालक त्यांना वस्तू देऊ शकत नाहीत परंतु तरीही त्यांचे हृदय ठेवण्यासाठी देतात. अशा परिस्थितीत मुलांसोबत हे अजिबात करू नका. मुलाला सर्वकाही देऊ नका.